दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तालुक्यातील चार शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच दिंडोरीत कार विहिरीत कोसळून इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
दुसरी घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली. कारणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रुद्र गणेश जाधव (वय १३) व ओमकार सुनील फटांगडे (वय १३) हे दोघे मंगळवारी दुपारी दोन वाजता ओहळात अंघोळीसाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोघेही मोहाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. सायखेडा पोलिसांत नोंद करण्यात आली.
