आजी आहे की वैरीण! 4 वर्षांच्या नातवाने पिचकारीने भिजवलं म्हणून गरम पाणी ओतलं, मुलगा 45% भाजला

जगभरात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. धुलिवंदन, होळी हे सण रंगाची, आनंदाची उधळण करण्याचा सण आहे.   4 वर्षांच्या ओम वारंगसाठी होळीची आठवण अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. चार वर्षांच्या मुलाला त्याच्या आजीने उकळते पाणी ओतल्याने गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्यासाठी आनंदाची, उत्साहाची होळी भयावह बनली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोराडी भागात घडली. ही घटना 3 मार्च रोजी आरामशीन परिसरातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडली आणि ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे असे या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या घराबाहेर रंगाने भरलेल्या स्प्रे बाटलीने खेळत होता. तो खेळत असताना, त्याने चुकून त्याची आजी सिंधू ठाकरे यांच्यावर पिचकारीने पाणी मारलं. सिंधू ठाकरे यांना ही गोष्ट न आवडल्यामुळे त्यांनी होळीच्या लाकडावर गरम केलेले बादलीभर पाणी ओमच्या अंगावर ओतले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

नातू 45% भाजला 

मुलाला कंबरेखाली गंभीर भाजले आहे आणि त्याला नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांचा अंदाज आहे की तो सुमारे 45 टक्के भाजला आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. पण तो पाहण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही जर संवेदनशील असाल तर हा व्हिडीओ बघणं टाळा. ज्यामध्ये सिंधू काळ्या साडीत पाण्याने भरलेली बादली घेऊन चालत असल्याचे दिसून आले आहे. मुलगा आजीकडे येतो आणि तिच्यावर रंग फवारण्याचा प्रयत्न करतो आणि ती बादलीतून त्याच्यावर पाणी फेकून प्रतिसाद देते. मुलगा वेदनेने ओरडतो आणि आजीपासून दूर उडी मारतो. आणखी एक महिला बादली घेऊन येते, कदाचित थंड पाणी असलेली, मुलाच्या वेदना कमी करण्यासाठी त्याच्यावर थंड पाणी फेकते. लवकरच आजी देखील त्याच्या भाजलेल्या जखमांवर थंड पाणी फेकण्याचा प्रयत्न करते.

धुळवडीला गालबोट 

रंग, गुलाल उधळत  मुंबईकरांनी धुळवडीचा आनंद लुटला, मात्र त्याचवेळी विविध ठिकाणी होळी खेळताना 45 जण जखमी झाले. यंदा मारहाणीच्या घटनांत वाढ झाली असून एके ठिकाणी मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याने धुळवडीला गालबोट लागले. धुळवड खेळताना जखमी होणाऱ्यांची संख्या यंदा फारच कमी आहे. गेल्यावर्षी ही संख्या 93 होती. मंगळवारी ग्रहण असल्याने धुळवड साजरी करण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र मुंबईकरांनी बिनधास्त धुळवड साजरी केली. यावेळी नैसर्गिक रंग व पाण्याचा अधिक वापर झाल्याने दुखापतींच्या घटना कमी नोंदवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *