कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी 40 किलो सोन्याची पालखी

कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी 40 किलो सोन्याची पालखी

करवीर निवासिनी श्री. अंबाबाईला तब्बल 40 किलो सोन्यापासून पालखी बनवण्याचा संकल्प कोल्हापुरातील भक्तांनी केला आहे. आतापर्यंत जमा झालेल्या सोन्यातून देवीच्या पालखीसाठी मोर्चेल, चवरी आणि आब्दागिरी तयार झाली असून 14 ऑक्टोबर रोजी त्या देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
लोकसहभागातून प्रत्येकाच्या इच्छेनुसार सोनं स्वीकारुन सध्या श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने श्री. अंबाबाईसाठी सोन्याची पालखी करयाचं काम सुरु आहे. सुमारे 40 किलो सोन्याचा वापर करुण ही पालखी तयार केली जात आहे. आजपर्यंत ट्रस्टकडे 11 किलो सोने जमा झाले आहे. कारागिरांनी पालखी सोबतच या सोन्यातून देवीसाठी 3 किलो सोन्यातून मोर्चल, चवरी आणि अब्दागिरी बनवलेली आहे. येत्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर रोजी मंदिरातील गरुड मंडपात विशेष कार्यक्रमाद्वारे सोन्याचे मोर्चल, चवरी आणि अब्दागिरी अर्पण करण्यात येणार आहेत.
सुमारे 3 किलो सोन्यातून तयार करण्यात आलेल्या मोर्चेल आणि चवरीवर माणिक आणि पाचू यासह रत्नजडूत आहेत, मोर्चेलवर मयुराच्या मुद्रा असून, अत्यंत नाजूक आणि कलात्मक नक्षीकाम मोर्चेलवर पहायला मिळतात. लवकरच सुवर्ण पालखीचं काम पूर्ण होईल, असा विश्वास ट्रस्ट ने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *