11 दिवसांपूर्वी विवाह, भर मैदानात राणाला ठोकलं, सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांना… हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली?

पंजाबमधील मोहाली येथे कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बालाचौरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी सोहाना येथे कबड्डी कप सुरू असताना, तीन हल्लेखोरांनी ‘फॅन’ असल्याचे सांगून सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राणा यांच्या जवळ जाऊन डोक्यात गोळ्या झाडल्या. उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राणा हे हिमाचल प्रदेशातील ऊना येथील राजघराण्याशी संबंधित होते आणि त्यांनी अवघ्या ११ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केला होता.

राणा बालाचौरियाहे मूळचे हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील राजेशाही कुटुंबातील होते, पण ते पंजाबमधील नवांशहरच्या बलाचौर येथे स्थायिक झाले होते. ते कबड्डीचे चाहते होते आणि कबड्डीला प्रोत्साहन देत असत. सोमवारी संध्याकाळी सोहानाच्या कबड्डी कपमध्ये ते उपस्थित होते. बोलेरो गाडीतून आलेल्या तीन तरुणांनी त्यांना गाठले. ‘आम्ही तुझे फॅन आहोत, सेल्फी काढायची आहे,’ असे म्हणत ते राणा यांच्या जवळ आले आणि त्यांनी डोक्यात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

राणा यांचे पणजोबा हिमाचल प्रदेशातील एका रियासतीचे राजे होते. त्यांनी सुरुवातीला कुस्ती खेळली आणि नंतर कबड्डीपटू बनले. त्यांनी स्वतःची कबड्डी टीम तयार केली होती आणि ते कबड्डीचे प्रमोटर म्हणूनही काम करत होते. यासोबतच ते मॉडेलिंगमध्येही सक्रिय होते आणि लवकरच काही गाण्यांमध्ये दिसणार होते. नुकतेच त्यांनी देहरादूनमधील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांनंतरच त्यांच्या पत्नीच्या डोक्यातील सिंदूर पुसला गेला.

फोर्टिस रुग्णालयात आणण्यापूर्वीच राणा यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय कंवर दिग्विजय सिंह यांना सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. राणा यांचे मित्र सांगतात की, त्यांचे कुटुंब मूळचे हिमाचलचे असले तरी ते अनेक वर्षांपासून बलाचौरमध्ये राहत होते.

अभ्यासादरम्यान त्यांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि नंतर कबड्डीकडे वळले. ते एका श्रीमंत कुटुंबातील होते आणि त्यांना महागड्या गाड्या आणि शस्त्रे बाळगण्याचा छंद होता. मित्रांच्या मते, ते श्रीमंत असूनही मोहालीत सुरुवातीला बाईकने फिरत असत आणि मेहनतीने त्यांनी हे यश मिळवले. असेही सांगितले जाते की, शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंहजी राणा यांच्या पूर्वजांच्या घरी थांबले होते आणि त्यांनी या घरात १०० साख्ये (धार्मिक ग्रंथ) लिहिल्या होत्या. राणा यांचे मंगळवारी दुपारी मोहाली येथील सहा फेज रुग्णालयात पोस्टमार्टम केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *