कोटानिहाय जशा जागा रिक्त होतात, त्या पद्धतीने या जागा भरल्या जातात. सध्या ‘एमपीएससी’तून भरती होणाऱ्या उपजिल्हाधिकारी पदाच्या ५८ जागा रिक्त आहेत. पण, राज्य सरकारकडून योग्य वेळेत ‘एमपीएससी’कडे त्याबाबतची मागणी नोंदवली गेली नसल्यामुळे ही भरती इतक्यात होणे शक्य नाही.

दुसरीकडे तहसीलदार पदावरील व्यक्तीला बढती देऊन उपजिल्हाधिकारी करण्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी अंतिम करावी लागते. शिवाय या कोट्यातील जागाही रिक्त असाव्या लागतात. सध्या या कोट्यातील जागा रिक्त नाहीत. त्यानंतरही १५० तहसीलदारांना पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचा विरोध का?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एमपीएससीच्या माध्यमातून तहसीलदार उपजिल्हाधिकारी अशा विविध पदावर नोकरी मिळवण्याची अपेक्षा करतात. मात्र उपजिल्हाधिकारी पदे ही पदोन्नतीने भरली गेल्यास भविष्यात या पदांसाठीचे मागणी पत्र एमपीएससी कडे येणार नाही. त्यामुळे एमपीएससीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय उमेदवारांना थेट उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता ही कमी होणार आहे. त्यामुळे यासाठी विरोध होत आहे.