नुकताच करवाचौथचं व्रत करण्यात आलं. हे व्रत महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घयुष्यासाठी करतात. हे व्रत त्या 12 जणींनी पण आपल्या नवऱ्याचा प्रगती, यश आणि दीर्घयुष्यासाठी केलं. दिवसभर पाण्याचा एक घुट पण घेतला नाही. संध्याकाळी नववधूचा श्रृंगार करुन त्यांनी चंद्राचे दर्शन घेतले. नवऱ्याचा हाताने पाणी ग्रहण केलं. त्यानंतर कुटुंबासोबत जेवण्याचा आनंद घेतला. पण सकाळी उठल्यावर 12 कुटुंबावर जोरदार धक्का बसला आहे. कारण या 12 जणी रात्री घरातून पळून गेल्यात. ही धक्कादायक घटना बिहारमधून अलीगडमधील असून परिसरात खळबळ माजली आहे.
त्या रात्री असं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार फरार महिला बिहारच्या असल्याने सांगितलं जात आहे, तर त्यांचं लग्न लावणारा मध्यस्थही फरार आहे. 12 कुटुंबांपैकी 4 कुटुंबांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कुटुंबे इग्लासमधील एका मध्यस्थाच्या संपर्कात आली. इग्लास परिसरातील रहिवासी सचिन नावाच्या एका व्यक्तीमार्फत त्यांची त्या मध्यस्थाशी ओळख झाली असल्याचे वृत्त आहे. मुली त्याच्या घरी राहत असल्याचेही सांगण्यात येत आहे. इग्लासमधील कैलाश नगर येथील रहिवासी वीर सिंग यांनी सांगितलं की, त्यांनी एका संपर्काद्वारे इग्लासमधील मध्यस्थाशी संपर्क साधला.
त्यानंतर, प्रेमवीरचे लग्न मनीषा नावाच्या मुलीशी ठरवण्यात आलं होतं. त्यांनी शुक्रवारी, करवा चौथच्या दिवशी हाथरस येथे कोर्ट मॅरेज केलं. त्याची बहीण आरती देवी आणि मेहुणे आर्यन सिंग साक्षीदार होते. त्यांच्या आधार कार्डवर बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील मंगराव हे गाव दाखवले आहे. घरी परतल्यावर, प्रेमवीर आणि मनीषा यांना वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिला.
करवा चौथ सणासोबतच झालेला हा विवाह सोहळा सर्व विधींसह पार पडला. या सणासाठी नववधूने सोन्याचे कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या आणि इतर दागिने घातले होते. उत्सवानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले आणि झोपी गेले. सकाळी उठल्यावर पाहिले तर मनीषा गायब होती.
त्यांनी घराची झडती घेतली पण ती कुठेही सापडली नाही. ती दागिने घेऊन फरार झाल्याचे आढळून आले. 9 ऑक्टोबर रोजी बिहारची रहिवासी असलेली शोभा हिचे लग्न सासनीगेट परिसरातील दौलत वाली माता जवळील मथुरा रोड येथील रहिवासी निहाल शर्मा यांचा मुलगा प्रतीक शर्मा याच्याशी झाले होते. त्यांच्याकडून अनेक हप्त्यांमध्ये ऑनलाइन 1.20 लाख रुपये काढून घेण्यात आले. सकाळी शोभा घरीही सापडली नाही आणि तिने झोपण्यासाठी घातलेले दागिनेही गायब होते.
माजी महापौर शकुंतला भारती म्हणाल्या की, इग्लासमधील भौरा जैथौली येथील रहिवासी काळू आणि सुंदर यांचे लग्न एकाच मध्यस्थामार्फत झाले होते. त्याच मध्यस्थाला या कुटुंबांकडून प्रत्येकी एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली. त्या म्हणाल्या की, ऑनलाइन व्यवहारादरम्यान ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते तो मुस्लिम असल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे इतर आठ कुटुंबे प्रभावित झाली आहेत, परंतु सामाजिक कलंकामुळे ते पुढे येण्यास कचरत आहेत.
