रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी करण्यात आलेला सर्व्हे आणि आताच्या सर्व्हेत दुप्पटीनं वाढ झाली आहे. नव्यानं करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 392 गावं दरडप्रवण म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पुनर्वसन करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांवर दरड कोसळण्याचं संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील 392 गावं दरडप्रवणन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या 392 गावांपैकी 71 गावं ही अतिधोकादायक दरड क्षेत्रात येतात. त्यामुळे पावसाआधीच या गावातील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास या गावांमध्ये मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावी अशी मागणी गावक-यांकडून करण्यात येत आहे.
मागच्या 20 वर्षात रायगडमध्ये दरड कोसळण्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. महाडमधील तळीये आणि खालापूरमधील इरसालवाडीच्या जखमा अजूनही
ताज्याच आहेत. दरम्यान या घटनानंतर सरकारच्या जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्यावतीनं रायगडमधील डोगंर भागातील वाड्या वस्तांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं असून दरडप्रवणनं गावांना नोटीस देण्यात आली आहे.
पावसळ्यात या गावांवर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान कोणत्या तालुक्यात किती गावं ही दरडप्रवण क्षेत्रात येतात त्यावर एक नजर टाकुयात.
कोणत्या तालुक्यात किती गावं?
अलिबाग 9, कर्जत 5, खालापूर 12, तळा 3,पनवेल 3, पेण 113, पोलादपूर 140, महाड 121, माणगाव 22, मुरुड 9, म्हसळा 14, रोहा 20, श्रीवर्धन 12, सुधागड 9
मागील काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय. दरम्यान आता पावसाळा सुरू झालाय. प्रशासनाकडून देखील दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दरडग्रस्त गावांचं पुनवर्सन करण्यात यावं अशी मागणी जोर धरु लागली आहे.