तुळजापूर ड्रग्स प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. ड्रग्स प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. मुख्य आरोपींना जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर राजकीय दबाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. ड्रग्स प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने सुरू असून मुख्य आरोपींना जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केलाय. यासंदर्भात आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपीला मोकाट सोडलं आहे. चार्जशीटमध्ये गंभीर त्रुटी आहेत अशा सर्व तक्रारी ते मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत.
तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपासावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना जाणीवपूर्वक वाचवलं जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानं तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात आता ठाकरेंचे नेते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाराहेत. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.