विमान प्रवासात सामान हरवलं; एअरलाइन कंपनीविरोधात कोर्टात पोहोचला प्रवासी, आता तब्बल 1.25 लाखांची नुकसान भरपाई

सौदी अरेबियातील फ्लायनास एअरलाइन्स कंपनीला एका प्रवाशाला १.२५ लाख रुपये भरपाई द्यावी लागणार आहे. प्रवाशाचे सामान हरवले होते. त्यानंतर मुंबई उपनगरीय जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने अलिकडेच आदेशात म्हटले आहे की, फ्लायनास एअरलाइन्सकडून दुर्भावनापूर्ण निष्काळजीपणा करण्यात आला आहे. एअरलाइन्सने बॅग हरवली असल्याच कळल्यावरही शोधण्याचा प्रयत्न केला नाही.

आयोगाने एअरलाइन्सना सामान हरवल्याबद्दल तक्रारदाराला १.२५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. ज्यामध्ये १५ जानेवारी २०२५ पासून ते पैसे देईपर्यंत सहा टक्के व्याज समाविष्ट आहे. एअरलाइन्सला मानसिक त्रासासाठी १०,००० रुपये भरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले.

संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या?

तक्रारदार त्याच्या कुटुंबासह 23 डिसेंबर 2023 ते ३ जानेवारी 2024 दरम्यान मुंबईहून तुर्कीच्या सहलीला गेली होती. त्यांची परतीची फ्लाइट इस्तंबूलहून होती, रियाधहून कनेक्टिंग फ्लाइट होती.

तक्रारकर्त्याने सांगितले की, इस्तंबूल विमानतळावर त्याने चेक-इनसाठी पाच बॅगा दिल्या होत्या. एअरलाइन कर्मचाऱ्यांनी चुकून फक्त चार बॅगा टॅग केल्या. पाचवी बॅग कन्व्हेयर बेल्टवर टॅगशिवाय गेली. तिकीट आणि बॅग काउंटरवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

तक्रारदाराला फक्त चार बॅगा परत मिळाल्या

कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला प्रत्यक्ष टॅग दिला. त्याला मुंबईत सर्व बॅगा मिळतील असे आश्वासन देण्यात आले. मुंबई विमानतळावर त्याला फक्त चार बॅगा मिळाल्या. हरवलेली बॅग शोधण्यासाठी तक्रारदाराने ईमेल, व्हॉट्सऍप चॅट, लेखी तक्रारी, वैयक्तिक बैठकींद्वारे अनेक वेळा संपर्क साधला, परंतु एअरलाइनने योग्य कारवाई केली नाही. अखेर पीडितेने आयोगाकडे तक्रार केली. एअरलाइनचा कोणताही प्रतिनिधी सुनावणीला उपस्थित राहिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *