बदनापूर शहरात वाढती ट्रॅफिक रस्ते लहान त्यामुळे शहरात नेहमी छोटे मोठे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.जालना छत्रपती संभाजीनगर रोडवर बसलेले बदनापूर शहर आता झपाट्याने वाढत आहे.परंतु रस्ते अरुंद होत चालले आहेत .त्यातच हातगाड्या फळवाले यांचे अतिक्रमण होत आहे.त्यामुळे ट्रॉफिक सतत जाम होते असते .मात्र बदनापूर पोलिस उघड्या डोळ्याने पाहत आहेत अशी प्रतिक्रिया स्थानिक लोकांकडून देण्यात येते. काल दुपारी भरधाव लोडिंग ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी वरील तरुणी आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. अर्पिता गणेश गरुड वय वर्ष १४ असे तरुणीचे नाव आहे.विशेष म्हणजे हा अपघात अगदी पोलीस स्टेशनच्या समोरासमोर झाल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.
वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू
देऊळगाव राजा येथील गणेश गरुड व मुलगी अर्पित हे दोघे आज सकाळी देऊळगाव राजाकडे संभाजीनगर कडून येत होते त्यातच दुचाकी बदनापूर पोलीस स्टेशन समोर आल्यानंतर ट्रक एमएच ४६ सी यु 97 11 या दुचाकीच्या हँडलला धक्का लागला त्यामुळे वाहनचालक गणेश गरूड यांचा दुचाकीवरील तोल गेला. दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेली मुलगी अर्पिता ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकाची मोठी गर्दी जमा झाली.
स्थानिकांकडून मागणी
बदनापूर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपासणी करिता मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला .त्यानंतर अपघातातील वाहन हे रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक सुरू केली या प्रकरणी पोलिसांनी चालकला ताब्यात घेतले आहे. दरम्यान बदनापूर शहरातून जाणारा जालना छत्रपती संभाजीनगर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण हटवण्यात आले होते तरी ही रिक्षा व फेरीवाले रोडवरती थांबत असल्याने वाहतूक अडथळा निर्माण होत असून मुळे असे अपघात घडत असतात. त्यामुळे येथील अपघात टाळण्यासाठी रस्तासंबंधी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.