पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा हरतात तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे, पण जिंकल्यावर ते काहीच बोलत नाहीत. यानंतर सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी यासंदर्भात निर्णय दिलाय.
