कर्णधार विराट आणि सलामीवीर लोकेश राहुलने अर्धशतकं झळकावली

कर्णधार विराट आणि सलामीवीर लोकेश राहुलने अर्धशतकं झळकावली

पहिल्या कसोटीत श्रीलंकेकडून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारताची सुरुवात अडखळत झाली आहे. सलामीवीर मुरली विजयह अजिंक्य रहाणे तंबूत परतले आहेत

गॉल कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघात तीन बदल करण्यात आलेत. फिरकीपटू हरभजन सिंहला विश्रांती देऊन अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीला संघात जागा देण्यात आली आहे. पण भारताची सुरुवातचं अडखळत झाल्याने आजच्या दिवसात भारतीय संघ बॅकफूटवर जातो का हे पहावं लागणार आहे.

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला कोलंबोच्या सारा ओव्हल स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराची फेअरवेल टेस्ट असलेली ही कसोटी विराट कोहलीच्या भारतीय संघाच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची ठरावी.

गॉलच्या पहिल्या कसोटीत 192 धावांची आघाडी घेऊनही टीम इंडियाला 63 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला स्वीकारावा लागला होता. गॉलच्या त्या कसोटीत झालेल्या चुका आणि टीम कॉम्बिनेशनमध्ये राहून गेलेल्या उणिवा दूर करून भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी सारा ओव्हलच्या मैदानात उतरेल. पण त्याच वेळी या कसोटीसह मालिकाही जिंकून कुमार संगकाराला त्याच्या कारकीर्दीला साजेसा सेण्डॉफ देण्याचा अँजलो मॅथ्यूजच्या श्रीलंका संघाचा प्रयत्न असेल.

श्रीलंका दौऱ्यातल्या दुसऱ्या कसोटीसाठी शिखर धवनऐवजी मुरली विजयचं भारतीय संघातलं पुनरागमन निश्चित मानलं जात आहे. शिखर धवनला उजव्या हाताच्या दुखापतीमुळं या दौऱ्यातून माघारी परतावं लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *