आई रागावल्याने मुलाची नदीत आत्महत्या

आतापर्यंत कुठे होतास, जेवण केले नाहीस’ असे आईने रागावल्याने नववीच्या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मौदा येथे घडली. मनीषलाल बहादुर पटले, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

स्थानिक शिर्डी साई विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी असलेल्या मनीषलाल बहादुर पटले या विद्यार्थ्याला त्याची आई रागावली. आईने रागावल्याने मनिषलाल हा रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सायकलने जुन्या पुलावर आला. तसेच सायकल पुलावर सोडून रागाच्या भरात नदीत उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिसांना मनिषलालची शोधाशोध सुरू केली; परंतु, त्याचा मृतदेह सापडला नाही. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. यात विशेष शोधपथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान दहा कि.मी. अंतरावरील चिकना घाटापर्यंत शोधले तरी मृतदेह सापडला नाही. कन्हान नदीचा प्रवाह तेज असल्यामुळे त्याला अडचणीचा सामना करावा लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *