निधनापूर्वी स्वराज बोलल्या होत्या… १ रु. घेऊन जा!

सुषमा स्वराज यांच्या निधनाचा अवघ्या काही मिनिटं आधी जेष्ठ वकिल हरिश साळवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू यशस्वीपणे मांडणाऱ्या साळवे यांनी मंगळवारी स्वराज यांना फोन केला होता. सुषमा यांनी त्यांना बुधवारी भेटायला बोलावले होते आणि त्यांची १ रुपयाची फीदेखील घेऊन जाण्यास सांगितले होते… हे आठवून साळवे भावुक झाले.

माजी महाधिवक्ता हरिश साळवे यांनी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुलभूषण जाधव यांची केस आंतरराष्ट्रीय कोर्टात लढवली. साळवे यांनी या केसच्या मानधनापोटी केवळ १ रुपया प्रतिकात्मक शुल्क घेतले. पाकिस्तानने मात्रे या केससाठी २० कोटी रुपये खर्च केले. साळवे यांनी बोलताना सांगितले की मंगळवारी रात्री ८.५० वाजता त्यांचं सुषमा स्वराज यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले, ‘मी ८.५० वाजता स्वराज यांना फोन केला होता. आज त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मला धक्का बसलाय. आमचं बोलणं खूपच भावुक झालं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या संध्याकाळी ६ वाजता या आणि तुमची १ रुपया फी घेऊन जा. मला सुचतच नाहीए की मी काय बोलू. सुषमाजी एक खूपच शक्तीशाली मंत्री होत्या. माझ्या मनात त्यांच्या निधनामुळे एक मोठी बहीण गमावल्याची भावना आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *