ओढ्यात वाहून गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये ओढ्यात वाहून गेलेल्या दोन शाळकरी मुलांचे मृतदेह सापडले आहेत. हे विद्यार्थी सरस्वती भुवन हायस्कुलमध्ये सातवीच्या वर्गात शिकत होते. तमजील शेख आणि मिनाज शेख असे दोन्ही विद्यार्थांची नावे आहेत.

दुपारच्या वेळी शाळेत दप्तर ठेवून जवळच असलेल्या नदी व ओढ्याच्या संगमाजवळ शौचास गेले होते. या औढयाचे खोलीकरण केल्याने १२ ते १५ फुटापर्यंत पाणी आणि गाळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

पाय घसरून एकजण पडला असता त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याचे प्रयत्न असफल ठरले आणि दोघांचा मृत्यु झाला . ओढ्याजवळ विद्यार्थाची एक चप्पल मिळाल्याने संशय आला. त्यानंतर शोधा शोध केली असता मध्यरात्रीला एक मृतदेह आणि आज २ ऑगस्ट सकाळी सुर्योदयासमयी दुसरा मृतदेह मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *