कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

कल्याण-ठाकुर्ली स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडली आहे. या मार्गावरील लोकल तब्बल ४५ ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. पहाटे सात वाजल्यापासून निर्माण झालेली ही परिस्थिती दोन तासांनंतरही कायम असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयात निघालेल्या नोकरदारांची कोंडी झाली आहे.

पहाटे साडे सहाच्या सुमारास कल्याण-ठाकुर्ली स्थानकाच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रखडल्या. त्यामुळं बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. उशिराने धावणाऱ्या लोकलमध्येही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *