आजही खोळंबा; मध्य रेल्वे १५ मिनिटे उशिराने

आज सलग तिसऱ्या दिवशी कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) येणारी रेल्वे वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या सर्व प्रवासी संघटनांनी रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रेल्वे वाहतुकीचा काही ना काही कारणामुळे खोळंबा होत आहे, वा लोकल उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी असे होत असल्याने चाकमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी हा दररोजचा त्रास असून यापुढे रेल्वे प्रशासनाने ८० लाख प्रवाशांना वेठीस धरू नये असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.

रेल्वे वाहतुकीत या समस्या का येत आहेत, याची तपासणी करून यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशीही मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *