‘पद्मश्री’ परत करण्याची इच्छा: सैफअली खान

२०१० साली अभिनेता सैफ अली खानला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच सोशल मीडियावर सैफला सगळ्यांनी ट्रोल केले होते.

पुरस्कार मिळून १० वर्ष झाली असलीतरीही मी या सन्मानास पात्र नाही. मला पुरस्कार परत करण्याची इच्छा आहे, असे सैफअली खान याने सांगितले. नुकत्याच एका ‘टॉक शो’ दरम्यान त्याने हे वक्तव्य केलंय. अरबाज खानच्या एका रिअॅलिटी शोमध्ये सैफला त्याच्याबद्दल होणाऱ्या ट्रोलिंग संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. कार्यक्रमाच्या स्क्रिप्टनुसार सैफला तैमूर अली खान, पद्मश्री पुरस्कार यांसारख्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजेस संबंधी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर प्रतिसाद देत असताना, पद्मश्री पुरस्काराच्या घोषणेनंतर मी स्वतःच आश्चर्यचकित झालो होतो. आजही इंडस्ट्रीत या सन्मानास पात्र असे अनेक लोक आहेत. त्यामुळे हा पुरस्कार मी स्वीकारायला नको होता, असे सैफने सांगितले.

पुरस्काराच्या घोषणेनंतर, ‘तू पुरस्कार नाकारण्याच्या परिस्थितीत नाहीस’,असे मला वडिलांनी समजावले होते. त्यामुळे मी मोठ्या मानाने हा सन्मान स्वीकारला आणि भविष्यात त्या पुरस्कारास साजेशी कामगिरी करून दाखवण्याचे ठरवले, असे सैफने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *