जम्मुमध्ये बर्फवृष्टी; यवतमाळचे पर्यटक अडकले

जम्मुमध्ये गुरुवारी झालेल्या अतिबर्फवृष्टीत महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले असून त्यात यवतमाळ येथील १० जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. पवन अराठे, विकास शेटे, मनीष अग्रवाल, प्रशांत शेटे, शेखर एनगंटीवार, शुभम गिरमकर, सागर सूर्यवंशी, रितेश निलावार, रवी ठाकूर अशी यवतमाळातील पर्यटकांची नावे आहेत.

हे सर्वजण दिल्लीवरून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून हे सर्वजण पटनी टॉप भागात आले असता बर्फवृष्टी  झाली. त्यामुळे या भागातील रस्ते बंद झाल्याने अनेक जण त्यात अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासन आणि संरक्षण दलाची मदत पथकांच्या माध्यमातून बर्फ हटविण्याचे काम सुरू असून लवकरच पर्यटकांना बाहेर काढले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *