ठाणे – मध्य रेल्वेमार्गावरील कळवा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे.
ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळेस वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणा-या नोकरवर्गाचे प्रचंड हाल होत आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावरील ठाणे ते कल्याणदरम्यानची वाहतूक धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
या मार्गावरील सर्व गाड्या अर्धा तास उशिराने धावत असून धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.