गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यांच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. मात्र त्यानंतरही राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमधील पाण्याची पातळी खालावलेलीच आहे.
राज्यात एकूण दोन हजार ४९८ धरणे असून या धरणांमध्ये १६ मेपर्यंत केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. मराठवाडा भागात तर दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. या भागातील धरणांमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या भागातील पाणीटंचाईची समस्या तीव्र आहे.
एकूण पाणीसाठ्यापैकी कोकण भागातील धरणांमध्ये ३३ टक्के, नागपूर २२ टक्के, अमरावती २६ टक्के, नाशिक २५ टक्के आणि पुणे २३ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. तर इतर धरणांमध्ये ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षी १६ मे पर्यंत राज्यातील धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यात २३ टक्के पाणीसाठा तर कोकण ३२ टक्के, नागपूर ४० टक्के, अमरावती ३७ टक्के, नाशिक २५ टक्के आणि पुण्यातील धरणांमध्ये २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.