राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी स्थानिक मॅजेस्ट्रिट कोर्टात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याविरोधात कोर्टात जबाब नोंदवण्यात आला आहे. ‘मित्र’ एनजीओशी निगडीत चेतन धीमान नावाच्या व्यक्तीने विश्वचषक दौऱ्यादरम्यान तक्रार नोंदवली होती.
काय आहे प्रकरण ?
विश्वचषक सामन्यात 15 फेब्रुवारी 2015 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होता. त्यावेळी अमिताभ आणि अभिषेक यांनी तिरंगा उंचावला होता. त्यानंतर त्यांनी तोच तिरंगा खांद्यावर बांधल्याचा आरोप आहे.
बच्चन यांच्या या पवित्र्यामुळे तिरंग्याचा अवमान झाला, असा आरोप चेतन धीमान यांचा आहे.

