विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे

विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे

निसर्गकवी ना. धो. महानोर यांच्या नकारामुळे रखडलेली विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अखेर झाली आहे. येत्या ५ व ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी आज ही माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी स्मृती वर्षाचे औचित्य साधून चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमान येथे भरवण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे. स्थळाच्या निश्चितीनंतर साहित्य महामंडळाने संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सर्वप्रथम ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळ असताना संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मिरवणे मला योग्य वाटत नसल्याचे सांगत त्यांनी नकार दिला होता. निवृत्ती न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाही अध्यक्ष होण्यास असमर्थता दर्शवली होती. अखेर महामंडळाने शेषराव मोरे, विवेक घळसासी, विनय हर्डीकर, वा. ना. उत्पात, प्र. ल. गावडे, शं. ना. नवलगुंदकर, विजय कुवळेकर अशा नावांची यादी तयार केली. त्यापैकी शेषराव मोरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *