ठाकरेंनीच मुंबई बकाल केली- नारायण राणे

ठाकरेंनीच मुंबई बकाल केली- नारायण राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भ्रष्ट असून, सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे सांगत, आता राज्यभर दौरे करून आपण या सरकारला सळो की पळो करून सोडणार, असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने काढलेल्या मोर्च्यावेळी ते बोलत होते.

भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांना कारभार नीट करता येत नाही. दोन्ही पक्षांचे विशेष करुन उद्धव ठाकरेंचे मंत्री अकार्यक्षम आहेत. ठाकरेंनीच मुंबई बकाल केली. सामान्य माणसाच्या विकासाशी देणे घेणे नसणा-या या सरकारच्या विरोधात आता राज्यभर दौरा करून आपण सरकारला सळो की पळो करून सोडणार असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्यावतीने काढलेल्या मोर्च्यासमोर दिला.

पालकमंत्री केसरकर कोकणच्या विकासाआड येत आहे असा आरोप करत नारायण राणे यांनी कोकणच्या विकासाच्या आड येणा-या मंत्र्यांना ‘याद राखा’ असा इशारा दिला. कोकणच्या विकासाकरिता मी निधी वाढवून दिला आणि सध्याचे मंत्री हा निधी कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे मी होऊ देणार नाही, असे राणे म्हणाले. पदवीच्या मुद्यावरुन त्यांनी विनोद तावडेंची खिल्ली उडवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *