पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी नोटाबंदी निर्णयाचं कौतुक केलं आहे. ‘नोटाबंदी निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर आळा आणेल’, असा विश्वास जशोदाबेन यांनी व्यक्त केला आहे. तसंच ‘केंद्र सरकार देशाच्या प्रगती आणि विकासासाठी काम करत राहील’, अशी आशाही व्यक्त केली आहे. नोटाबंदी निर्णयावरुन देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
‘500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर आळा बसेल. परदेशात लपवून ठेवण्यात आलेला काळा पैसा या निर्णयामुळे परत येईल’, असं जशोदाबेन बोलल्या आहेत.
राजस्थानमधील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
मोदी सरकारच्या कामकाजाविषयी विचारला असता केंद्र सरकारच्या आतापर्यंत कामकाजाचं त्यांनी कौतुक केलं. तसंच केंद्र सरकार यापुढेही भारताच्या प्रगती आणि विकासासाठी काम सुरु ठेवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.