मुंबईतील कचरा ठाण्यात नको, अशी भूमिका घेत मनसेने पालिकेच्या कचर्याच्या गाड्या अडवल्या आहेत. यावेळी मनसेने आंदोलन केले. मुलूंड डंम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास आलेल्या महानगरपालिकेच्या गाड्या मनसेने अडवत विरोध केला. ठाणे येथील हरिओम नगर येथे हे आंदोलन करण्यात आले. पालिका अधिकार्यांना बोलावण्याची मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.