बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरूख खानला २०१२ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर शिवीगाळ केल्या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी शाहरूखला अखेर क्लिन चीट दिली आहे.
‘२०१२ मध्ये शाहरूख दारूच्या नशेत नव्हता तसेच त्याने कोणतेही अपशब्द वापरलेले नाही,’ असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक असणा-या शाहरूखने १६ मे २०१२ मध्ये कोलकात्याच्या विजयानंतर आपल्या मुलांसह मित्रांबरोबर मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांना अडवले. त्यावेळी त्याने सुरक्षारक्षकांसह एमसीएफच्या पदाधिका-यांबरोबर हुज्जत घातली. याची गंभीर दखल घेत एमसीएने त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घातली होती.
केकेआर आणि मुंबई इंडियन्समधील सामन्यानंतर हा वाद झाला होता. शाहरुखवर २०१७ पर्यंत स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती.