आसाममध्ये मुसळधार पावसानंतर तीन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याने दहा नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील सोनाचिरा येथे पहाटेच्या सुमारास घडली.
सोनाचिरा येथे दरड कोसळल्याने एकाच कुटूंबामधील पाच सदस्यांचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळते. दरड कोसळल्याने हे कुंटुंब संपूर्ण ढिगा-याखाली गाडले गेल्याने यामध्ये पिता, माता, एक मुलगी व दोन मुलांचा मृत्यू झाला.
हैलाकंडी जिल्ह्यामध्येही दोन ठिकाणी दरडी कोसळली. एका ठिकाणी चार जणांचा तर दुस-या परिसरात एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यु झाला.
घटनास्थळी पोलीस व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग तात्काळ दाखल झाले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.