उच्चदाबाने विद्युत वहन करणारी विद्युत तार कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुझफ्फरनगर येथील बेनीबाद गावात ही दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील काही व्यक्तींच्या अंगावर ही तार कोसळल्याने सहा जण ठार झाले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात बिहारमध्ये गारपीट आणि वीजेमुळे नऊ जण ठार झाले आहेत. त्यापैकी पुरेना, जहानाबाद आणि जमुई जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर मुझफ्फरनगर, दरभंगा आणि नावडा येथे प्रत्येकी एक जण ठार झाले आहेत. गारपीट, वीज आणि पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले असून आंबे आणि लिचीचे पीक खराब झाले आहे. हवामानखात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पूर्वेकडील भागात आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.