दुस-या टी-२० सामन्यात भारताचा २७ धावांनी विजय

दुस-या टी-२० सामन्यात भारताचा २७ धावांनी विजय

दुस-या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिकाही २-० अशी जिंकली आहे.

प्रथम फलंदाजी करणा-या भारताने सलामीवीर रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. २० षटकात भारताने तीन गड्यांच्या बदल्यात १८४ धावा केल्या.

मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकांत आठ गड्यांच्या बदल्यात १५७ धावा करता आल्या.

भारताचे गोलंदाज बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी दोन तर अश्विन, पांड्या आणि युवराजने प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्याआधी, भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनीही सुरुवातीला सावध खेळ केला. रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतक केले तर धवन ग्लेन मॅक्‍सवेलच्या गोलंदाजीवर ४२ धावावर बाद झाला. तर रोहितने ४७ चेंडूत ६० धावा केल्या.

रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर विराट कोहलीने कोहलीने ७ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोणीने ९ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १४ धावा केल्या.

अखेरच्या षटकामध्ये उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी बाद झाला. कोहली ५९ धावांवर नाबाद राहिला. तर सुरेश रैना एकही चेंडू न खेळता नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅक्‍सवेल आणि अँड्रयू टाय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *