बिचून गावातील एका शाळेत फडकविलेला भारताचा तिरंगा काढून त्याचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गावातील राजकीय बालिका उच्च प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते. संध्याकाळी साधारण 6 वाजता गावातील एका समाजातील पाच जण शाळेच्या दिशेने आले. त्यामध्ये तीन अल्पवयीनांचाही समावेश होता. त्यांनी तिरंगा खाली उतरवला आणि त्याचा अवमान करून तो जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शालेय प्रशासनाला ही घटना समजल्यावर त्यांनी तातडीने आग विझवली. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. ही घटना गावात समजल्यानंतर गावकरी शाळेच्या परिसरात जमा झाले. त्यांनी आरोपींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.