पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 45 भारतीय मच्छिमांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांनी अरबी समुद्रात 45 भारतीय मच्छिमारांसह पाच बोटी ताब्यात घेतल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना कराची येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांकडून नेहमीच सागरी सीमेचे नकळत उल्लंघन केल्याप्रकरणी मच्छिमारांना अटक केली जाते. अनेक भारतीय मच्छिमारांनी पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगली आहे.