मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण ‘अवयव दात्यां’च्या प्रतिक्षेत!

मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण ‘अवयव दात्यां’च्या प्रतिक्षेत!

जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’ या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

एकट्या मुंबईत २०११ पासून २५६ किडनी, १३६ लिवर, ०४ हृदय आणि ०२ फुफ्फुस अशा एकूण ३९८ अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरी, मुंबईत अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीत एकूण २,७३७ गरजूंची नोंदणी आहे. ज्यामध्ये २,५६५ किडनी, १५५ लिव्हर, १५ हृदय आणि २ फुफ्फुसे आवश्यक आहेत.

भारतात दरवर्षी पाच लाख जण अवयव मिळू न शकल्यानं मृत्युमुखी पडतात. यातील दोन लाख जण लिवर या आजारानं, तर पन्नास हजार रुग्ण हृदयविकाराच्या आजारानं मरण पावतात. दरवर्षी सुमारे दीड लाख जणांना किडनीची गरज भासते. मात्र, त्यातील फक्त पाच हजार जणांनाच किडनी मिळते. देशात दहा लाख अंध रुग्ण अजूनही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयव दानाचा संकल्प करुन मृत्युनंतरही आपण समाजाला अत्यंत उपयोगी ठरू शकतो. म्हणूनच सहज शक्य असं हे महादान प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *