भाजपच्या वाचाळवीर खासदार योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा आपल्या वाचळतेचं दर्शन घडवलं आहे. काश्मीर हा काही मुस्लिमांचा बापाचा नाही असं वादग्रस्त विधान आदित्यनाथ यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आदित्यनाथ बोलत होते. धर्मांतरीत झालेल्या हिंदूंच्या घरवापसीला विरोध केला जातो. मात्र, काश्मीर आणि उत्तरांचलमधून हद्दपार करण्यात आलेल्या हिंदुंबद्दल देशातला एकही धर्मनिरपेक्ष नेता चकार शब्द काढत नाही अशा शब्दात त्यांनी घरवापसीला पाठिंबा दर्शवला आहे.
विशेष म्हणजे राजकारणाचं हिंदूकरण करा, असं आवाहनही यावेळी आदित्यनाथ यांनी केलं. योगी आदित्यनाथ सातत्याने वादग्रस्त विधानं करत आहेत, मात्र तरीही भाजपकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.