अब की बार.. तुरडाळ २०० पार

अब की बार.. तुरडाळ २०० पार

तहान लागल्यानंतर सरकारने विहीर खणायला घेतली असून तुरडाळीचे भाव २०० रुपये गेल्यानंतर परदेशातून आणखी तीन हजार टन डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींची साठेबाजी करणा-यांवर कडक कारवाईचे आदेश केंद्राने राज्य सरकारना दिले आहेत.

डाळ दरवाढीचा धसका केंद्राने घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी ग्राहक संरक्षण, कृषी, व्यापार व अन्य खात्यांशी तसेच सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने चर्चा केली. सरकारने आणखी दोन हजार टन तुरडाळ तर एक हजार टन उडिद डाळ आयातीचा निर्णय घेतला.

२०१४-१५ या काळात तुरडाळीचे उत्पादन २ दशलक्ष टन घटून ते १७.२० दशलक्ष टन झाले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून डाळीच्या भावात प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षी याच काळात तुरडाळीचे दर ८५ रुपये किलो होते ते आता २०० पेक्षा अधिक झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्राहक वितरण खात्याने दिली आहे. गेल्या पाच वर्षात तुरडाळीचे दर ७४ ते ८५ रुपये दरम्यान होते.

सरकारने ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय भांडार व मदर डेअरीच्या सफल केंद्रातून अनुदानित दरात तुरडाळ विकणे सुरू केले आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडू सरकारनेही हाच कित्ता गिरवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *