50 वर्षापूर्वी इतिहासातील सर्वात विनाशकारी घटना घडली होती. 2027 इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. 2027 मध्ये सीम टू सेम तसचं घडताना दिसत आहे. येत्या काही महिन्यांत जगावर एका भयानक नैसर्गिक संकट ओढवणार आहे. यामुळे प्रचंड विध्वंस होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी गभीर इशारा दिला आहे.
2027 मध्ये ‘अल निनो’चा विनाशकारी प्रभाव दिसणार आहे. यामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. 1877-78 या वर्षात भयानक नैसर्गिक घटना घडली होती. 2027 मध्ये देखील अशीच घटना घडणार आहे. ‘अल निनो’ पेक्षाही अधिक मोठा विध्वंस घडवू शकते. जगात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि उपासमारीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे.
50 वर्षांपूर्वी ‘अल निनो’चा जगाला भयानक फटका बसला होता. जगात तीव्र उष्णतेची लाट आली होती. प्रदीर्घ कालावधीपर्यंत दुष्काळस्थिती होती. यामुळे पीकांच नुकसान झाले, नापिकीमुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली होती. मृत्यू इतके भीषण होते की जगाची 100 टक्के लोकसंख्या नष्ट झाली. ही इतिहासात नोंदवलेल्या सर्वात विनाशकारी हवामान घटनांपैकी ही एक मानली जाते. सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता चिंताजनक संकेत मिळत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
हवामानात भयानक बदल
पॅसिफिक महासागराचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी बदल्याचा हवामानाबाबत भयानक इशारा दिला आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. एल निनोच्या निर्मितीची ही सर्वात भयानक स्थिती आहे. या तीव्रतेमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत, कारण सध्याचा कल असाच सुरू राहिल्यास ‘मेगा’ किंवा ‘सुपर’ एल निनो तयार होऊ शकतो.
एल निनोची निर्मिती, विशेषतः मेगा किंवा सुपर अल निनोमुळे, जागतिक हवामान प्रणालींमध्ये लक्षणीय बदल होतात होऊ शकतात. 2027 च्या शेवट पर्यंत जागतिक तापमान नवीन विक्रमी पातळीवर पोहोचवू शकते. तापमानातील या प्रचंड वाढीमुळे जगभरात दुष्काळ पडेल आणि अन्नटंचाई अधिक गंभीर होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
अल निनो हा एल निनो-सदर्न ऑसिलेशन (ENSO) चक्राचा एक भाग आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागर असामान्य उष्णता निर्माण होते तेव्हा एल निनो सारखी परिस्थिती निर्माण होते. यामुळे उष्णता वातावरणीय अभिसरण पद्धतींमध्ये बदल घडतो. मान्सूनवरही याचा परिणाम होऊ शकतो. उष्णतेच्या लाटा वाढतात. या वाढलेल्या उष्णतेमुळे खंडांमधील पर्जन्याच्या वितरणात बदल होतो.
अल निनोचा उगम पॅसिफिक महासागरात होतो, परंतु त्याचे परिणाम जगभर जाणवतात. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य आफ्रिका आणि ॲमेझॉन खोऱ्यात तीव्र उष्णता आणि वणवा पेटू शकतात. दुसरीकडे, अमेरिकेच्या काही भागांमध्ये, विशेषतः दक्षिण भागात, मुसळधार पाऊस आणि पूर येऊ शकतो. उत्तर अमेरिकेत उष्णतेच्या अधिक लाटा येऊ शकतात.
समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान झपाट्याने वाढत आहे. एल निनो घटनेच्या निर्मितीचे संकेत देत आहे, ज्यामुळे २०२७ पर्यंत जागतिक तापमान नवीन विक्रमी पातळीवर पोहोचू शकते. या तीव्र तापमानामुळे जगभरात दुष्काळ पडेल आणि अन्नटंचाई अधिकच गंभीर होईल.
अल निनोचा भारतावर काय परिणाम होणार?
अल निनोचा भारतावर थेट परिणाम होणार आहे. भारताची शेती आणि पाण्याच व्यवस्थापन मान्सूनवर अवलंबून आहे. अल निनोचा यावर थेट परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात तीव्र आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. तसेच, यामुळे मान्सूनच्या हंगामात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
या घटनेमुळे पिकांचे उत्पन्न घटेल. अन्नधान्याच्या किंमती वाढतील. हवामान बदलामुळे भारतातील तापमान आधीच वाढत आहे. अल निनोमुळे ही उष्णता आणखी वाढेल. यामुळे अशी हवामान परिस्थिती निर्माण होईल, जी दुष्काळासारख्या परिस्थितीला कारणीभूत ठरू शकते.सध्या परिस्थती भयानक असली तरी शास्त्रज्ञांच्या मते याला ‘मेगा अल निनो’ म्हणता येणार नाही. मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. उष्णता-व्यवस्थाप
