इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य पूर्वेतील इस्त्राइल, अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबई विमानतळावरील वाहतुकीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार युद्धामुळे मुंबई विमानतळावरील 350 विमाने रद्द करण्यात आली. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. यात विद्यार्थी, खेळाडू, सामान्य नागरिक, पर्यटकांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे.
मुंबई विमानतळावरून रद्द झालेल्या फ्लाइटपैकी 67 विमाने उड्डाण करणार होती, तर 58 विमाने लँडिंग करणार होती. तर दिल्ली विमानतळावरून 60 विमानांचे उड्डाण झाली असून 40 विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले आहे.
‘या’ सेवांवर परिणाम झाला!
मुंबई विमानतळावरील एअर इंडिया कंपनीचे मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणाऱ्या सर्व फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत.
तर इंडिगोनेही अनेक फ्लाइट रद्द केल्या आहेत. ज्यात पश्चिम आशियातील आपली उड्डाणे रद्द केली आहेत. तर मुंबई – लंडन सेवा विस्कळीत झाली आहे.
दिल्ली, मुंबई आणि अमृतसर तसंच लंडन (हीथ्रो आणि गॅटविक), न्यूयॉर्क (जेएफके), नेवार्क, शिकागो (व्हिएन्ना मार्गे), टोरोंटो (व्हिएन्ना मार्गे), फ्रँकफर्ट आणि पॅरिस दरम्यानच्या उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत.
अकासा एअरलाइन्सने घोषणा केली आहे की, अबूधाबी, दोहा, जेद्दाह, कुवेत आणि रियाधला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व उड्डाणे 2 मार्च 2026 सोमवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच एअरलाइन्सने आपल्या ग्राहकांना विनंती केली आहे की, 7 मार्चपर्यंत या शहरांमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या बुकिंगसाठी प्रवासी पूर्ण परतफेड करु शकणार आहेत. प्रवासी त्यांची फ्लाइट पुन्हा शेड्यूल करु शकता, त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुक्ल आकारले जाणार नाही.
