दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, बापाला केलेली मदत ठरली शेवटची

रविवारी दुपारी पेठ रस्त्यावरील तवली फाटा येथे एका भीषण अपघातात मयूर सुरेश भोये (15) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मयूर रस्त्यालगत उसाच्या रसाचा गाडा चालवत असताना एका भरधाव कारने त्याला जोराची धडक दिली. मयूरची सध्या दहावीची परीक्षा सुरू होती. सुटीच्या दिवशी वडिलांना कामात मदत करत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेमुळे भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी 4 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर मोकळ्या जागेत वडिलांना उसाचा रस काढण्यास मदत करणाऱ्या मयूर सुरेश भोये (15) या विद्यार्थ्याला भरधाव कारने (MH 15 KK 6464) जोरदार धडक दिली.

अपघातानंतर वडिलांनी मयूरला तातडीने रिक्षाद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासात मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. दहावीची परीक्षा सुरू असतानाच मयूरचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत 

डोंबिवली येथे राहणाऱ्या 18 वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात झालेला मृत्यू ही अत्यंत हृदयद्रावक घटना 10 फेब्रुवारी 2026 रोजी घडली. सोहम सचिन कटरे (वय १८), रा. लक्ष्मणनगर, तवली फाटा, पेठ रोड येथे राहणारा होता. ही घटना मंगळवारी 10 फेब्रुवारी) सकाळी 9.55 च्या सुमारास कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. सोहम बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा (इंग्रजी विषय) पहिलाच पेपर देण्यासाठी कळवा येथील मनीषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जात होता. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे सोहमचा पाय घसरला किंवा त्याचा तोल गेला आणि तो धावत्या गाडीतून खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच सकाळी 10.30 च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ठाणे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *