शाळेत जाणाऱ्या दोन चिमुकलींना विहिरीत ढकलून निर्घृण हत्या, गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती, काय घडलं?

भुसावळ तालुक्यातील साक्री गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली गावातीलच रहिवासी असून त्या शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडली. शाळेत जात असताना साकरी गावात दोन अल्पवयीन मुलींना एका अज्ञात इसमाने विहिरीत ढकलून देत दोघं मुलींची निर्घृण हत्या करण्यात आली, असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटनेची माहिती मिळतात गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली होती. संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी म्हणून नरेंद्र चौधरी याच्यावर गंभीर आरोप करत त्याला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी त्याला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असून काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणत अतिरिक्त बंदोबस्त करण्यात केला आहे.

जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनांसाठी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे मात्र मृतदेह ताब्यात घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मुलींचे मृतदेह लवकरात लवकर ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोलिसांकडून संशयित आरोपीची सखोल चौकशी सुरू असून हत्या नेमकी का आणि कशा पद्धतीने करण्यात आली याचा तपास सुरू आहे. अधिकृत माहिती अध्याप समोर आली नसली तरी या घटनेने साकरीसह परिसरात एकच भीतीच्या वातावरण निर्माण झाले आहे पालक वर्गांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांनी अपवाद विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *