निफाडमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू; नातेवाईकांचा शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप, प्रकरण काय?

तालुक्यातील नैताळे येथील १३ वर्षीय सार्थक संजय बोरगुडे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सार्थकच्या नातेवाइकांनी केला. याप्रकरणी मुखेड (ता. येवला) येथील ओम दिनानाथ गुरुकुलचे व्यवस्थापक श्रीराम भीमराव पांगरे यांच्याविरोधात येवला पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.

नेमकं काय घडलं?
सार्थकचे चुलते समाधान विठ्ठल बोरगुडे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सार्थक हा वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी दि.२५ जून २०२५ पासून ओम दिनानाथ गुरुकुल येथे दाखल होता. रविवार, दि.२१ डिसेंबर रोजी कुटुंबीय सार्थकला भेटण्यासाठी गुरुकुलमध्ये गेले असता तो तेथे आढळून आला नाही. याबाबत व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता, ‘तो गावात गेला असेल’ असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता, गुरुकुलपासून पाचशे मीटर अंतरावर गोई नदीकाठावरील विहिरीजवळ संशयास्पद स्थिती आढळली.

स्थानिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतल्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता सार्थकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यास तातडीने येवला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संस्थेच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेळ्या चोरणारे संशयित अटकेत
निफाड तालुक्यातील वाकद देवगाव फाटा येथून शेळ्या चोरणाऱ्या दोन संशयितांना लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले. ४ ऑगस्ट रोजी रात्री वाकद देवगाव येथून पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी काठेवाडी जातीच्या ३० हजार रुपये किमतीच्या सहा शेळ्या चोरून नेल्या होत्या. याबाबत द्रोपदा बाजीराव शिंदे (वय ६०, रा. देवगाव) यांनी लासलगाव पोलिसांत तक्रार दिली होती. बाळू गंगाधर कुऱ्हाड (वय ४६), कृष्णा पेव्हल माळी (वय ३५, दोन्ही रा. धामोरी ता. कोपरगाव) या संशयितांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *