चार दिवसांपूर्वी महिला बेपत्ता असल्याची तक्रार, काल तलावात पुरुषासह महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला; लातूरमध्ये नक्की काय घडलं?

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे गावाजवळील घरणी नदीजवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील विसर्जन तलावात संगाप्पा महाराज पुलाजवळ दोन मृतदेह सापडले आहेत. यात एक मृतदेह पुरुषाचा व एका महिलेचा असल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

नळेगाव ते सावंतवाडीकडे जाणाऱ्या रोडवर घरणी नदीच्या पात्रालगत विसर्जन तलावात दोन मृतदेह सोमवारी दि. 15 डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली. अनिता लक्ष्मण तेलंगे (वय 35, रा. नळेगाव) ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दि. 11 डिसेंबर रोजी चाकूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती. मात्र, शोध घेऊनही त्या कुठेही आढळून आली नाही. तसेच राजकुमार हणमंत शृंगारे (वय 40, रा. नळेगाव ह.मु. विटभट्टी आष्टामोड) हेही मागच्या तीन दिवसापासून बेपत्ता होते. पण त्यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली नव्हती. या दोघांचेही मृतदेह काल सोमवारी येथील विसर्जन तलावात तरंगताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळून आले.

दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे पाठवले आहे. चाकूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. एल. नीलकंठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर जाधव, शत्रुघ्न शिंदे, शिरीष नागरगोजे, योगेश मरपल्ले, हे करीत आहेत.

पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

चंद्रपूरातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. या क्रूर प्रकाराने महाराष्ट्र हादरला आहे. जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला. बळीराजाच्या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल. मात्र सरकार, प्रशासनाला बळीराजाचं आभाळाएवढं दुःख कधी दिसलंच नाही.

चंद्रपूर जिल्हातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे. सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढवला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहेत. निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला मात्र पुरता हरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *