ललिता प्रसाद शिक्षिकेला वेळेवर कापडी वैद्यकीय उपचार न कात्रज-कोंढवा रस्त्यावर सोमवारी (१५ डिसेंबर) दुपारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ललिता प्रसाद कापडी (वय ५३, रा. कात्रज-कोंढवा रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षिका होत्या. दुचाकीवरून जात असताना, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता.
सोमवारी कात्रज-कोंढवा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी पुतळ्याजवळ मुख्य रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे परिसरात सकाळपासूनच वाहतूक कोंडी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्कॉन मंदिराजवळील चौकाच्या पुढे हनुमान मंदिराजवळ ललिता कापडी दुचाकीवरून जात होत्या. त्या वेळी घाईत त्या उलट्या दिशेने गेल्या. रस्ता वळवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात त्या आले नाही. या वेळी एका भरधाव कंटेनरच्या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रिक्षातून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत उपचारासाठी दाखल करता आले नाही. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ललिता कापडी यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले असून त्या त्यांच्या मुलीसोबत राहत होत्या.
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले, ‘ललिता कापडी या महंमदवाडीतील खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या सकाळी दुचाकीवरून जवळच्या चौकात पोहोचण्यासाठी उलट्या दिशेने दुचाकी चालवत होत्या. त्यावेळी हा अपघात झाला.’ कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून रस्ता अद्याप अपूर्ण आहे.
या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे रस्ता वळवण्यात आला, त्याची योग्य माहिती न मिळाल्याने हा अपघात झाला. याला जबाबदार कोण,’ असा प्रश्न शिवसेना ((उबाठा) नेते वसंत मोरे यांनी केला आहे.
