आधी बेपत्ता, नंतर नदीकिनारी बॉडी; घराबाहेर गेली ते आलीच नाही…विवाहितेच्या मृत्यूने रायगडमध्ये खळबळ

कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विजया अनिल कालुंके असं मृत महिलेचं नाव आहे. त्या कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ बिल्डिंगमध्ये राहत होत्या. सोमवारी त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा मृतदेह पोसरी गावाजवळ उल्हास नदीच्या किनाऱ्यावर सापडला. त्या मानसिकदृष्ट्या आजारी होत्या, अशी माहिती मिळत आहे.

विजया कालुंके यांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मंगळवारी दुपारी काही नागरिकांना उल्हास नदीच्या किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवलं. त्यांनी पोलिसांना मृतदेहाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया कालुंके सोमवारी घराबाहेर पडल्या होत्या. त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी कर्जत पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

कालुंके कुटुंबीय मूळचं सातारा जिल्ह्यातील कराड येथील आहेत. ते मागील २५ वर्षांपासून कर्जतमध्ये राहत आहेत. विजया यांना पती आणि मुलगा आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीमध्ये, विजया मानसिक दृष्ट्या कमजोर होत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. मृतदेह नेमका कुठून वाहत आला, आत्महत्या नेमकी कधी आणि कशी झाली याचा तपास पोलीस करत आहेत. विवाहितेच्या अशा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विजया यांनी आत्महत्या का केली, याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे कर्जत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पोलिस उपनिरीक्षक मनाली शिंदे, पोलिस हवालदार अनिल वडते, अनिल खैरनार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत कार्यवाही सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *