हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा आईवडिलांनी केला होता. मात्र, शवविच्छेदनात खुनाचे बिंग फुटले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी मृताच्या आईवडिलांसह दाजीविरुद्ध गुन्हा नोंदवला. विशाल गोकुळ पाटील (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विशालची पत्नी पूजा (३४) हिने गंगापूर पोलिसांत संशयित सासरा गोकुळ पाटील, सासू शशिकला व जावई उमेश काळे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपासून गणपती गार्डनजवळील परिसरात पाटील कुटुंब वास्तव्यास असून त्यांना मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे आहेत. त्यांचा मुलगा विशाल काही वर्षांपासून अति मद्यसेवन करीत होता. कोणत्याही कारणातून तो आईवडिलांसह पत्नीला मारहाण करून परिसरात गोंधळ घालायचा. या प्रकरणाला त्रासलेल्या आईवडिलांनी जावयाच्या मदतीने त्याची हत्या केली.
काहीच त्रास न झाल्याने केलं दुर्लक्ष अन्…
बुधवारी रात्री कामाच्या ओघात जास्त त्रास होत असल्याने त्यांनी खोकल्याच्या औषधाच्या बाटलीऐवजी चुकून कपडे स्वच्छ करण्याच्या लिक्विडची बाटली घेतली आणि त्यामधील लिक्विड ते प्यायले. काही वेळाने चुकून लिक्विड प्यायल्याची जाणीव होताच त्यांनी ती बॉटल फेकून दिली. मात्र त्यावेळी त्यांना लगेच प्रकृतीसंदर्भातील काहीच त्रास न झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नाष्टा करताना सबाजित यांना अचानक रक्ताची उलटी झाली.
रुग्णालयात नेत असताना दिली कबुली
शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयाच्या नेलं. रुग्णालयाकडे घेऊन जात असताना प्रवासात सबाजित यांनी कबुली देताना चुकून आपण काल कपडे स्वच्छ करण्याचं लिक्विड प्यायल्याचे सांगितले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान संध्याकाळी सबाजित यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
ती बाटली सापडलीच नाही
सबाजित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला? याच्या तपासणीसाठी काही नमुने ‘फॉरेन्सिक’साठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांना ज्या लिक्विडमुळे सबाजित यांचा मृत्यू झाला ते लिक्वीड असलेली बाटलीदेखील अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस उपनिरीक्षक रफिक शेख तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये सबाजित यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांबरोबरच आजूबाजूच्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.