किती वाजता तिकीट बुक केल्यास कन्फर्म होण्याचा चान्स अधिक

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी दरवर्षी मुंबईतून कोकणात दाखल होतात. मुंबईत कामानिमित्त स्थायिक झालेले कोकणातील नागरिक गणपतीच्या सणासाठी आवर्जून गावी जात असतात. यासाठी ते रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांचा वापर करतात. यंदा गणपतीचं आगमन 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी 22,23, आणि 24 ऑगस्ट रोजी अनुक्रमे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असल्यानं कोकणात जाणाऱ्यांसाठी हे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने 23 जूनपासून बुकिंग सुरु केलं आहे.

कधीचं तिकीट कधी बुक करता येणार?

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेनं प्रवास करायचा असल्यास आगाऊ आरक्षण करायचं असल्यास तो कालावधी दोन महिने निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळं 22 ते 24 ऑगस्टच्या दरम्यान कोकणात ज्यांना जायचं आहे. त्यांना 23 जूनपासून रेल्वेच्या तिकिट आरक्षित करता येणार आहे. एसटी आणि खासगी वाहनांच्या तुलनेत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. ज्यांना रेल्वेनं कोकणात जायचं आहे ते 22 ऑगस्टचं तिकीट 23 जून, 23 ऑगस्टचं तिकीट 24 जून, 24 ऑगस्टचं 25 जून, 25 ऑगस्टचं 26 जून, 26 ऑगस्टचं  27 जून,  27 ऑगस्टचं तिकीट 28 जून, 28 ऑगस्टचं तिकीट 29 जून रोजी बुकिंग करता येईल.

रेल्वेच्या तिकिटांचं बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत मोबाईल अॅप आणि वेबसाईटवरुन करता येते. याशिवाय ट्रेन कुठं पोहोचली आहे हे जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अॅपचा वापर करता येऊ शकतो.

कुठून निघायचं आणि कुठे जायचं हे ही महत्त्वाचं

तिकीट बुक करताना कोणत्या स्टेशनवरुन निघायचं आणि कोणत्या स्टेशनवर उतरायचं यासंदर्भातील विचार करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील स्टेशनवर उत्तर भारतातून येणाऱ्या आणि दक्षिण भारतातून येणाऱ्या ट्रेनचं बुकिंग एक दिवस अगोदर करावं लागेल. म्हणजेच जर तुम्ही 26 ऑगस्टला कल्याणहून खेड, चिपळूण, कणकवलीजाणार आहात तर त्याचं बुकिंग 26 जून पासूनच करु शकता. याशिवाय जर तुम्ही 3 सप्टेंबर 2025 ला कुडाळ, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड हून पनवेल, कल्याण आणि मुंबईला येणार असाल तर 4 जुलैपासून बुकिंग करु शकता.

तिकीट बुक करण्यासाठी आदर्श वेळ कोणती?

रेल्वे तिकीट बुक करताना एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे ती म्हणजे रात्री 12 वाजल्यानंतर दिवस बदलतो. त्यानंतर सुरुवातीची 20 मिनिटे तिकीट आरक्षित करता येत नाही. त्यामुळं तिकिट बुक करताना  ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच मध्यरात्रीच्या आसपास तिकीट बुकींग करण्याचा प्रयत्न केल्यास तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते, असं साधारणपणे म्हणता येईल. त्याशिवाय आयआरसीटीसीच्या नव्या नियमानुसार तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *