एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अर्ध्या तासात माघारी फिरले, पुन्हा मुंबईला परतले; नेमकं काय घडलं?

एअर इंडियाची मुंबईहून लंडनला जाणारे विमान अर्धा रस्त्यातच माघारी फिरले आहे. लंडनला जाणारे विमान पुन्हा मुंबईत परत यायला निघाले आहे. फ्लाइटरडार24 नुसार, एअर इंडियाचे विमान AI-129 ने आज सकाळीच मुंबईहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र पुन्हा हे विमान मुंबईत परतत आहे. यामागचं कारण काय, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी मुंबईहून लंडनला जाणारे विमान काहीच वेळात परत मुंबई विमानतळावर परतले आहे. यामागचे कारण ईराणने इस्राइलवर केलेला हल्ला असल्याचे बोलले जाते. ईराणवर इस्राइलने हल्ला केल्यानंतर ईराणी विमानतळ बंद करण्यात आल्यानंतर एअर इंडियाचे विमान AI-129 पुन्हा मुंबईत परतत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईराणवर इस्राइलने हल्ला केल्यानंतर ईराणचे एअरस्पेस बंद करण्यात आलं आहे. या मार्गाने जाणारी सर्व विमानाचे मार्ग वळवण्यात आले असतील किंवा विमानांना टेक ऑफ ओरिजनपर्यंत पुन्हा परतावे लागत आहे. फ्लाइटराडार 24 च्या आकडेवारीनुसार, इस्राइल आणि इराणवर ड्रोन आणि मिसाइल हल्ला केल्यानंतर शुक्रवारी तातडीने एअरलाइ कंपन्यांनी इस्राइल, ईराण आणि ईराकयेथून हवाई क्षेत्र खाली करण्यात आले आहे.

प्रवासी आणि केबिन क्रु यांच्या सुरक्षिततेसाठी एअरलाइनचे मार्ग वळवण्यात आले आहे. जगभरातील वाढत्या संघर्षामुळं एअरलाइन कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ड्रोन आणि मिसाइलचा हल्ले हे प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.

अहमदाबाद-लंडन विमान अपघातातात महाराष्ट्रातील 9 जण

अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 9 जणांनी आपला जीव गमावलाय. को पायलट सुमित सबरवाल हे मुंबईतील पवईचे रहिवासी आहेत. तर कॅबिन क्रू अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांची नातेवाईक असल्याची माहिती आहे. तसंच डोंबिवलीची रोशनी सोनघरे ही 27 वर्षांची मुलगीही या अपघातात मृत्यूमुखी पावली. रोशनी सोनघरे विमानाची क्रू मेंबर होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *