कोकण ऑन अलर्ट! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, पुन्हा पुराचे सावट; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

यंदा कोकणात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. काही ठिकाणी वादळवाऱ्यांनी मोठे नुकसानही केले. मे महिन्याच्या अखेरीसच कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी गाठली होती. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली कोलमडून पडली. हे सगळं जुलै महिन्यात नव्हे तर चक्क मे महिन्यातच आषाढासारखा पाऊस कोसळला. महाराष्ट्रात मराठवाड्यासह काही ठिकाणी तर मुंबई व कोकण परिसरात ही स्थिती पाहायला मिळाली. मात्र आता गेले काही दिवस पाऊस गायब झाला आहे, पुन्हा एकदा उष्णतेचा पारा चढला आहे. अशातच पाऊस कमबॅक करण्याच्या तयारीत आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात, यामुळे कोकणावासीयांसाठी संभाव्य पुराचा धोका वर्तवण्यात आला आहे.

मुंबई विभागीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतील, परिणामी नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते, कदाचित स्थानिक पूरामुळे पूल झाकले जाऊ शकतात, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, असे सूचित करण्यात आले. यामुळे कोकणवासीयांसाठी पुराचा धोक्याची घंटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *