हुश्शsss थँंक्यू दादा! काय तो प्रामाणिकपणा अन् काय ते समाधान, तीन लाखांचा ऐवज विसरून प्रवासी गेला, पुढे जे झालं ते…

दहा रुपये जरी हरवले तरी ते परत मिळतील याची शाश्वती नसते. मात्र साडेतीन लाख रुपयांचे साहित्य असलेली एक बॅग प्रवासी मेट्रो स्थानावर विसरतो आणि ती एकही वस्तू गायब नव्हता परत मिळते. कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन येथे तिकीट काउंटर येथे तिकीट खरेदी करतांना मेट्रो प्रवासी आपली बॅग तिथेच विसरला होता. सिक्युरिटी गार्ड रोहन यांच्या लक्षात आल्यावर ती बॅग त्यांनी तत्काळ ताब्यात घेतली आणि नियमानुसार त्यांनी स्टेशन कंट्रोल रूमकडे धाव घेतली.

स्टेशन कंट्रोलरने बॅगवर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत त्यांची बॅग कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन येथील कंट्रोल रूममध्ये असल्याचे सांगितले. मेट्रो प्रवासी रोहित मलानी स्टेशन परिसरात आल्यानंतर ती बॅग त्यांचीच असल्याची शहानिशा करून ती बॅग त्यांना सुपूर्द करण्यात आली. या बॅग मध्ये ३.५ लाख किंमतीचे साहित्य होते. आपली हरवलेली बॅग सुरक्षितपणे परत मिळाल्याने मेट्रो प्रशासनाचे तसेच कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

काही दिवसापूर्वी प्रजापती नगर मेट्रो स्टेशनवर आलेल्या एका ट्रेनमध्ये बिना टेंभरे या प्रवासी महिलेची पर्स सापडली. त्या पर्समध्ये सुमारे १ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ४ हजार रोख रक्कम होती. प्रवासादरम्यान त्या पर्स मेट्रोमध्येच विसरून स्टेशनवर उतरल्या होत्या. पर्समधील कागदांच्या आधारे त्यांच्याशी संपर्क साधला, सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. खात्री झाल्यानंतर, ही पर्स टेंभरे यांच्याकडे सुरक्षितपणे परत करण्यात आली. हा प्रसंग नागपूर मेट्रोतील कर्मचाऱ्यांची सचोटी, दक्षता आणि सेवाभाव अधोरेखित करणारा आहे. प्रवाशांच्या केवळ सुरक्षित प्रवासासाठी नव्हे, तर त्यांच्या वस्तूंच्या सुरक्षेसाठीही मेट्रो प्रशासन कटीबद्ध आहे, महामेट्रो नागपूर यांना आपल्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असून, भविष्यातही अशीच सेवा, प्रामाणिकता आणि विश्वास टिकवण्याची हमी घेत असल्याची भावना महामेट्रोने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *