नाशिककरांनो पाणी जपून वापरा! जिल्ह्यातील ‘या’ ७ धरणांनी गाठला तळ, कोणत्या धरणात किती पाणी?

जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी, धरणांमधील पाणीसाठा दिवसागणिक कमी होतो आहे. जिल्ह्यातील २४ पैकी ७ धरणांनी तळ गाठला असून, धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा २५ टक्क्यांच्या खाली आला आहे.

मे महिन्यातच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने गंगापूरसह चार धरणांमधील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली. कधी नव्हे ते नाशिकमध्ये मे महिन्यात पाणीवाढीचा दुर्मीळ योग पहायला मिळाला. परंतु त्यानंतर पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर पाऊसच नाही. याशिवाय जिल्हावासीयांची दैनंदिन पाण्याची गरज धरणांमधील पाण्याद्वारेच भागविली जात आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या आकाराच्या धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत त्यांमध्ये १६ हजार १९७ दशलक्ष घनफूट म्हणजेच २४.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी किमान ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे. सात धरणांनी तळ गाठला असून त्यांमध्ये साठवण क्षमतेच्या दहा टक्केदेखील पाणीसाठा उपलब्ध नाही.

ही धरणे कोरडीठाक
गंगापूर धरण समूहातील गौतमी गोदावरी धरणात केवळ ८.८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहामधील वाघाडमध्ये ३.१३ टक्के, तिसगावमध्ये २.४२ टक्के, भोजापूरमध्ये ०.५५ टक्के, तर गिरणा धरण समूहातील नागासाक्या धरणात २.५२ टक्के पाणी उपलब्ध आहे. पुणेगाव आणि माणिकपुंज धरण कोरडेठाक पडले आहे.

पाणीसाठ्याची स्थिती (टक्केवारी)
धरण पाणीसाठा

गंगापूर —–४४.४२
काश्यपी —–२८.५६
गौतमी गोदावरी —–८.८९
आळंदी —–११.२७
पालखेड —–५७.७३
करंजवण —–१०.००
वाघाड —–३.१३
ओझरखेड —–२२.८२
पुणेगाव —–००
तिसगाव —–२.४२
दारणा —–३५.५६
भावली —–१६.२५
मुकणे —–३४.४०
वालदेवी —–२०.६५
कडवा —–१५.७६
नांदूर मध्यमेश्वर —–१००
भोजापूर —–०.५५
चणकापूर —–२३.८२
हरणबारी —–२८.०४
केळझर —–३०.५९
नागासाक्या —–२.५२
गिरणा —–२१.५२
पुनद —–२५.३७
माणिकपुंज —–००
एकूण सरासरी —–२४.६७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *