शेवटी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? पाकिस्तानातच असलेल्या सर्वात मोठ्या शत्रुने सैन्य घुसवले, हल्ला करत अर्ध्या पाकिस्तानवर ताबा मिळवला

 भारताविरोधात कुरघोड्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. शेवटी पाकिस्तानचे दोन तुडके झाले आहेत. पाकिस्तानातच असलेल्या सर्वात मोठ्या शत्रुने अर्थात  बलुच लिबरेशन आर्मीने (BLA)  सैन्य घुसवत हल्ला केला आहे. बलुच आर्मी पाकिस्तनाचा हा सर्वात मोठा शत्रू आहे.  या शत्रुने अर्ध्या पाकिस्तानवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलुच लिबरेशन आर्मीने शनिवारी एक मोठी कारवाई केली. शनिवारी संध्याकाळी सशस्त्र गटाने क्वेटा-कराची महामार्ग रोखला. काही क्षणातच बलुच आर्मीने मुख्य महामार्ग ताब्यात घेतला. द बलुचिस्तान पोस्टने याबबातचे वृत्त दिले आहे. सशस्त्र दहशतवाद्यांनी लेव्हीज पोलिस स्टेशनवर हल्ला करत ही इमारत ताब्यात घेतली. हल्लेखोरांनी पोलिस अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले. यानंतर  इमारतीला आग लावली. पोलिस ठाण्यात असलेल्या पोलिसांच्या वाहनालाही आग लावण्यात आली आणि शस्त्रे लुटण्यात आली.

याआधी, बीएलएच्या सैनिकांनी सोराबमध्ये मोठा हल्ला केला होता. तसेच सोराबा शहर ताब्यात घेतले होते. बीएलएचे प्रवक्ते जियान बलोच यांनी त्यांच्या कमांडरनी सोराब शहराचा पूर्ण ताबा घेतल्याचा दावा केला आहे. अतिरेक्यांनी पोलिस स्टेशन, डीसी ऑफिस, गेस्ट हाऊस आणि बँका ताब्यात घेतल्या आणि व्यवस्था पूर्णपणे ठप्प केली. बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या कारवायांवरून हे स्पष्ट होते की बलुच बंडखोर सतत मजबूत होत आहेत. तर, दुसरीकडे  पाकिस्तानी सैन्याची पकड कमकुवत होत आहे.

दरम्यान, खुजदार नालमध्ये पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तानमधील आणखी एका सशस्त्र गटाने, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने स्वीकारली आहे. बीएलएफचे प्रवक्ते मेजर गौराम बलोच यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे.  शनिवारी 31 मे रोजी सकाळी 11 वाजता, खुजदार नाल येथील पडिच हॉटेलजवळ दहशतवाद्यांनी राज्याच्या शांतता दलाच्या दोन अधिकाऱ्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये दोघेही ठार झाले. राज्याविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या सर्व गटांना लक्ष्य केले जाईल असा इशारा बीएलएफच्या प्रवक्त्याने दिला. लढाऊंनी खारान शहरावरही हल्ला केला असल्याचाही दाव करण्यात आला आहे.

9 मे 2025  रोजी बलोचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानपासून बलोचिस्तानचे स्वातंत्र्य जाहीर केले होते. नी भारताला बलोचिस्तानला ओळख देण्याचे आणि नवी दिल्लीत दूतावास उघडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांकडून शांतितंत्र्य पाठवण्याची आणि पाकिस्तानी लष्कराला माघार घेण्याची मागणी केली होती.
1971 मध्ये बांग्लादेश मुक्ती युद्धानंतर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बांग्लादेश अस्तित्वात आला. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आहे. पाकिस्तानचे तीन तुकडे होण्याचा कारण ठरणार आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बलोच आर्मी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *